घरदेश-विदेशकाँग्रेस आमदारांना भाजपाकडून कोट्यवधी रूपयांची ऑफर; काँग्रेस नेत्याचा आरोप

काँग्रेस आमदारांना भाजपाकडून कोट्यवधी रूपयांची ऑफर; काँग्रेस नेत्याचा आरोप

Subscribe

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने काँग्रेस आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर देऊ केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाने कुरघोडी सुरू केली आहे. भाजपाने मध्य प्रदेशातील एका काँग्रेस आमदाराला विकत घेण्यासाठी २५ ते ३५ कोटींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी कर्नाटक काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपाने धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप केला जात होता. यावेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले होते. कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांमुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूने ९९ आमदारांनी मतदान केले. तर १०५ मत सरकारविरोधात गेली आणि सरकार कोसळलं होते.

मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत नाही. शिवराज चौहान आणि नरोत्तम मिश्र यांच्यात एकमत झालेले आहे. एक मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री पद घेण्याचे स्वप्न पाहत आहे. शिवराज चौहान यांच्याकडून काँग्रेस आमदारांना फोन लावण्यात येत आहेत. एका आमदाराला २५ ते ३५ कोटी रूपये ऑफर दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रूपये घ्या. दुसरा टप्पा म्हणजेच राज्यसभा निडणूक आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण रक्कम सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी देऊ, असे सांगितले जात आहे, अशी माहिती दिल्ली पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी दिली.

- Advertisement -

शिवराज चौहान यांनी लगावला टोला

दिग्विजय सिंह यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवराज चौहान म्हणाले की, खळबळजनक दावा करणे ही दिग्विजय सिंह यांची जुनी सवय आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे लक्ष विचलित करणे आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्याकडून हे आरोप केले जात असावेत, असा टोलाही यावेळी त्यांनी दिग्विजय सिंह यांना लगावला.

महाराष्ट्रातही रंगला होता सत्ताखेळ

महाराष्ट्रातही सत्तास्थापनेदरम्यान प्रचंड घडामोडी घडल्या. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना विविध हाॅटेल्समध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही आमदार फुटू नये, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला होता. यावेळी भाजपाकडून आमदारांना फोडण्यासाठी त्यांना आमिष दाखवण्यात येत आहेत, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे, तो खरा होतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -