संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना देशातही लॉकडाऊची परिस्थिती असताना कर्नाटकमध्ये मात्र शाही विवाह सोहळा पार पडला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचा विवाह आज संपन्न झाला असून ऐन लॉकडाऊनमध्ये हा सोहळा झाल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. कृष्णप्पा यांची नातं रेवती हिच्याशी लग्नगाठ बांधली असून कर्नाटक सरकारने मात्र या लग्नाचे व्हिडिओ शूटिंग केले आहे. सरकारची खास नजर या सोहळ्यावर होती.
Karnataka: Nikhil Kumarswamy, son of former Karnataka CM HD Kumaraswamy, tied the knot with Revathi, the grand-niece of former Congress Minister for Housing M Krishnappa, today in Bengaluru. pic.twitter.com/HrLpGD5s9p
— ANI (@ANI) April 17, 2020
असे घडले सारे
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुलाचा विवाह सोहळा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पडला. या जिल्ह्यात प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने फक्त २१ गाड्यांना या परिसरात प्रवेश देण्यात आला आहे. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, या लग्नाकरता आम्ही राज्य सरकारची परवानगी घेतली आहे. तसेच कुटुंबातील काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारनेही या संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ शूटींग केले जाईल, असे म्हटले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केले नसल्याचे आढळल्यास कारवाईदेखील करण्यात येईल.
Karnataka: Nikhil Kumarswamy, son of former Karnataka CM HD Kumaraswamy, will tie the knot with Revathi, the grand-niece of former Congress Minister for Housing M Krishnappa, today. Visuals of rituals that took place yesterday at HD Kumaraswamy's residence in Bengaluru. pic.twitter.com/oWpzEtYrNB
— ANI (@ANI) April 17, 2020
लॉकडाऊनमध्येही होत आहेत लग्नकार्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असातानाही अनेक ठिकाणी लग्नकार्य पार पडतानाच्या घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये संपन्न झालेल्या लग्नकार्याचे विशेष कौतुक झाले. फक्त २ ते ३ लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडले तर सर्व नातलग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या लग्नाला उपस्थित राहिले होते. शिवाय या नवविवाहीत जोडप्याने आहेराचे पैसे सरकारच्या सहायचता निधीला देण्याचेही आवाहन केले होते. तर दुसरी कडे उल्हासनगरमध्ये मात्र लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करून लग्न सोहळा पार पडला. मात्र त्या जोडप्याला घराऐवजी पोलीस ठाण्यात जावे लागले.