घरताज्या घडामोडीभाजप विरोधात काँग्रेसची उद्या नागपूरात सायकर रॅली, पुढील १० दिवस आंदोलन करणार...

भाजप विरोधात काँग्रेसची उद्या नागपूरात सायकर रॅली, पुढील १० दिवस आंदोलन करणार – नाना पटोले

Subscribe

मोदी आणि भाजपची पापे संपूर्ण देश भोगत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे

देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील जनतेचे जीवन मुश्किल केले आहे.  महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. भारतातून बाहेरील देशांना पेट्रोलचा पुरवठा केला जातो त्या देशात स्वस्तात पेट्रोल मिळत आहे भारतात मात्र पेट्रोलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. काँग्रेसने नेहमी लोकांचा विचार केला. सरकार हे जनतेसाठी असते केवळ जनतेच्या जिवावर पैसे कमवण्यासाठी नाही. केंद्रात बसून मोदी सरकारने हे पाप केले आहे. देशात समान्य जनतेचे जीवन हैराण करण्याऱ्या मोदी सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस पार्टीने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने केली जाणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या स्वत: नागपूरात सायकल रॅली काढून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.  पुढील दहा दिवस कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यात काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटनेचे सर्व लोक मिळून आंदोलने करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. (cycle rally against BJP in Nagpur tomorrow, agitation for next 10 days – Nana Patole)  दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या महिलांचा मोर्चा निघणार असून पुढील दहा दिवस काँग्रेसच्या विविध संघटना आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार गेली सात वर्षे सत्तेची मजा घेऊन आनंद साजरा करून लोकांना भ्रमात ठेवण्याचे काम करत आहे. त्यांचे लोकतंत्र संपले आहे. मोदी आणि भाजपची पापे संपूर्ण देश भोगत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम भाजपनेच केले आहे. २०१७च्या नागपूरच्या जिल्हापरिषदेत आपली इज्जत वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे पाप केले ते उघडकीस आल्यानंतर राजकारणात ओबीसींचे नुकसान झाले आणि त्यामुळे त्यांचे खोटे चेहरे बाहेर आले. अधिवेशनात आई बहिणीवरुन शिव्या देणाऱ्या भाजपने सुसंस्कृत संस्कृती जपणारे भाजप असल्याचे आता म्हणू नये आता त्यांना तो अधिकार राहिलेला नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार देशात आल्यापासून भाजप दबावतंत्राचे राजकारण चालवत आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचे सर्व जनतेला माहिती झाले आहे. दबावतंत्र वापरुन ईडी आणि सीबीआयचा दुरुउपयोग करण्यात आलाय.  आपल्याचे लोकांचे फोन टॅपिंग करण्याती वृत्ती यांच्यात येते कुठून? केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सूड वृत्तीचे राजकारण करुन मूळ मुद्द्यांला बाजूला सारून देश विकरण्याचे काम भाजप करत आहे. राज्यात दोन दिवसांपासून अधिवेशनात झालेली भाजपची अवस्था देखील संपूर्ण जनता पाहत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकत्र; फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -