घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ७५ अपघात, ३४ बळी

नाशिक शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ७५ अपघात, ३४ बळी

Subscribe

मृतांमध्ये ३० पुरुष आणि ४ महिलांचा समावेश

रस्ते अपघातांची मालिका काही केल्या संपत नसून, हेल्मेटसक्ती कठोर करण्यात येऊनही नियम पायदळी तुडवले जात असल्याची शोकांतिका आहे. परिणामी, शहरात ११ महिन्यांत तब्बल ७५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे अपघात झाल्याचे दिसून येते. या अपघातांमध्ये ३१ जीवघेणे असून, ३४ दुचाकीचालकांनी जीव गमावला आहे.

हेल्मेट वापरले असते, तर कदाचितद त्यांचे प्राण वाचले असते, असे कुटुंबियांसह पोलिसांकडूनही सांगण्यात येते. जीवघेण्या अपघातांमध्ये ३० पुरुष आणि ४ महिलांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, विनाहेल्मेटमुळे ११ महिन्यात ३६ गंभीर अपघात झाले आहेत. त्यात ४९ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात वर्गमर्यादेचे उल्लंघन केल्याने झाले आहेत. विशेष म्हणजे, कोरोना काळात अपघात कमी होते. तर निर्बंध शिथील होताच अपघातांची संख्या वाढली.

अशी आहेत अपघातांची कारणे

  • दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करणे
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणे
  • राष्ट्रीय महामार्गांसह उपरस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करणे
  • सिग्नल न पाळता भरधाव वेगाने दुचाकी चालवणे
  • धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवणे
  • लेन कटिंग करुन भरधाव वेगाने वाहने चालवणे
  • वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे

दुचाकीचालक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवतात. शिवाय, शहरातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांवरील कामांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवता. त्यातून जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ७५ विनाहेल्मेटमुळे अपघात झाले आहेत. दुचाकीचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा. आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे, याची आठवण ठेवावी.
– सीताराम गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -