ओमायक्रॉनचा संसर्ग वाढताच राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवार (दि. २४) पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा व आश्रमशाळाही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. जिल्हयात ५ हजार शाळा आहेत. त्यात साधारणत: १० लाख विद्यार्थी शिकतात. या सर्व शाळा १० जानेवारीपासून बंद आहेत. आता शासन निर्णयानंतर जिल्हाधिकार्यांनीही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नाशिकमधील शाळा सोमवारपासून सुरू , जिल्हाधिकार्यांचा निर्णय
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -