घरमुंबईशेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखरकारखाने सुरु राहतील - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखरकारखाने सुरु राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

हंगाम संपत आला तरी राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत 2.15 लाख हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले आहेत. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रती टनप्रमाणे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस अनुदान आढावा बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे 100 कोटी रुपयांचा वित्तीय पडणार आहे. 1 मे नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन ऊस गाळप होण्याचा आंदाज आहे.या गाळपावर 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या ऊसाला प्रतीटन पाच रुपये किलोमीटर वाहतूक आनुदान देण्यात येणार आहे.

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी आणि ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे ५५ हजार ९२० टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास १०१३.३१ लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -