जव्हार : पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग यांनी जव्हार येथे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवसानिमित्त लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते सागरी, नागरी, डोंगरी क्षेत्र लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला विशेष वाव आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, व महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
पर्यटनाला चालला देण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटनाच्या दृष्टीने सर्व मुबलक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांना नवीन रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीची समस्या सुटेल असा विश्वासही लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : चिमुकल्याचा मॅजिकबॉल गिळल्याने मृत्यू; पत्नीची पतीविरोधात