घरदेश-विदेशकाश्मीर लवकर स्वतंत्र्य होणार, सईद बरळला

काश्मीर लवकर स्वतंत्र्य होणार, सईद बरळला

Subscribe

काश्मीर स्वतंत्र्याचा दिवस आता लांब नाही. भारत पूर्ण जोर लावत आहे. पण, तुम्ही मात्र मागे हटू नका. तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हणत हाफिज सईदनं भारताविरोधात युद्धाचा इशारा दिला आहे. 

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जमात – उल – दावा या दहशतनवादी संघटनेचा प्रमुख  हाफिज सईदनं भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. यावेळी हाफिज सईदनं भारताविरोधात युद्ध करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, त्यानं यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये त्यानं काश्मीर लवकर स्वतंत्र्य होईल असं म्हटलं आहे. दोनच दिवसांपूर्वी पुलवामामध्ये जवानांनी कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला होता. शिवाय, सात स्थानिक देखील ठार झाले होते. त्यानंतर स्थानिकांनी जवानांवर दगडफेक देखील केली होती. हाच मुद्दा पकडत दहशतवादी हाफिज सईदनं व्हिडीओ जारी केला असून त्याद्वारे त्यानं स्थानिकांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडीओमध्ये हाफिज सईद म्हणतोय की, तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुमच्या बलिदानाची किंमत काश्मीर स्वातंत्र्य करून घेऊ. काश्मीर स्वतंत्र्याचा दिवस आता लांब नाही. भारत पूर्ण जोर लावत आहे. पण, तुम्ही मात्र मागे हटू नका. तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हणत हाफिज सईदनं भारताविरोधात युद्धाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

यापूर्वी देखील हाफिज सईदनं भारताविरोधात गरळ ओकली होती. तसाच प्रकार आता हाफिज सईदनं पुन्हा केला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असून सैन्य देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. पण, दहशतवादी आणि पाकिस्तानच्या या आगळीकीला भारताकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. आत्तापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा हा भारतीय सैन्यानं केलेला आहे. त्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा गरळ ओकून स्थानिकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -