घरपालघरयंदाही प्रशासकीय अर्थसंकल्प

यंदाही प्रशासकीय अर्थसंकल्प

Subscribe

कोविड प्रादुर्भाव व त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षे लांबल्या आहेत. याचे परिणाम म्हणून महासभेच्या अनुपस्थितीत पालिकेला अर्थसंकल्प सादर करावा लागत आहे.

वसईः वसई-विरार महापालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प १० मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. या वेळचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नेतृत्त्वात दुसर्‍यांदा सादर होईल. त्याआधी हा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी. यांनी सादर केला होता.मागील अर्थसंकल्पात कोविडमुळे रखडलेली कामे व अन्य आरोग्य सुविधांकरता तरतूद केली गेली होती. मात्र, या अर्थसंकल्पात आयुक्त कोणत्या नव्या संकल्पना व कामांसाठी तरतूद करतात, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे. कोविड प्रादुर्भाव व त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षे लांबल्या आहेत. याचे परिणाम म्हणून महासभेच्या अनुपस्थितीत पालिकेला अर्थसंकल्प सादर करावा लागत आहे.

मागील वर्षी पालिकेवर प्रशासक असलेल्या आयुक्त अनिलकुमार पवार यांनी साधारण २ हजार ३४७ ६८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात यावर्षी आणखी १०० ते २०० कोटीची भर पडेल, अशी शक्यता महापालिका सूत्रानी व्यक्त केली आहे. २०-२१ मध्ये कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकरता मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली होती. शिवाय त्या आधीच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या विकासकामांना पुढे नेण्याचे सूतोवाच २१-२२ च्या अर्थसंकल्पात करण्यात आले होते. त्याकरताही भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र कोविडचा प्रभाव कायम राहिल्याने या कामांना गती मिळाली नव्हती. ही कामे २०२२-२३ अर्थसंकल्पात मार्गी लावण्यासाठी तरतूद होती. यंदाही त्यातीलच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य मिळण्याची शक्यता महापालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यात मागील वर्षीसारखीच आस्थापना खर्च, नगररचना, पथदीप व विद्युत व्यवस्था, अग्निशमन, शहर स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालयीन सेवा, दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याणकारी योजना व परिवहन यांच्यावरील तरतूद कायम राहील, असे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. आयुक्त अनिलकुमार पवार यंदा नव्याने कोणत्या विकासकामांसाठी तरतूद करतात, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -