घरताज्या घडामोडीअतिउत्साही थाळीनाद करणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं

अतिउत्साही थाळीनाद करणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेने आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत. परंतु लोकप्रतिनिधी आणि जनतेनं रस्त्यावर उतरून एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नाही, तसेच सामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून थाळीनाद आणि घंटानाद करणे योग्य नाही, अशा शब्दात आपली नाराजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे असे सांगतानाच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी सोशल मीडियावर केले आहे.

- Advertisement -

एकजुट दाखवल्याबद्दल जनतेचे धन्यवाद – शरद पवार

विश्वातल्या संपूर्ण जनतेवर कोरोनाचं महाभयंकर संकट आलेले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तीगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचे कौतुक केले आहे.

परंतु इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सुचवलेलं आहे त्याला आपण सगळेजण साथ देऊ या आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -