घरदेश-विदेशअखिलेश यादव म्हणतात, निवडणूक आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर...

अखिलेश यादव म्हणतात, निवडणूक आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर…

Subscribe

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा पराभव झाला. यानंतर पक्षाने अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. निवडणूक निकालात आपलाच विजय होईल असे अखिले यादव कार्यकर्त्यांना सांगत होते. अखिलेश यादव यांनी पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे विधाना त्यांनी केले आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया एका मुलाखतीत दिली.

अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपला बेईमान ठरवले आहे. अखिलेश यादव सध्या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. यावेळी ते भाजपच्या विजयामागे सरकारी यंत्रणांचा हात असल्याचे कार्यकरत्यांना पटवून देत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणूक असो की लोकसभेची दोन जागांची पोटनिवडणूक समाजवादी पक्षाच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग आहे. भाजपच्या बेईमानीमुळे पराभव झाला. आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

- Advertisement -

संस्थांच्या निष्पक्षपातीपणावर संशय –

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही वाचवण्याचे आवाहन करत राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती. आता देशातील कोणतीही संस्था तटस्थ राहिलेली नाही. सरकारकडून दबाव आणून या संस्थांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते आसा आरोप त्यांनी भाजपवर केला.

- Advertisement -

दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही. आझमगढमध्ये सपा कार्यकर्त्यांविरोधात रेड कार्ड जारी करण्यात आले. निवडणूक आयोग झोपले होते का? त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -