माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेता अटल बिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. नवी दिल्ली येथील अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह अन्य कुटुंबियांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.
१६ ऑगस्ट २०१८ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी यांना किडनी संसर्गासह मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासलं होतं.
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at 'Sadaiv Atal' – the memorial of former PM #AtalBihariVajpayee, on his first death anniversary today. pic.twitter.com/KjJtmrF4D6
— ANI (@ANI) August 16, 2019
दिल्लीत असणाऱ्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर आजच्या दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अटल बिहारी वाजपेयींची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह परिवारातील काही सदस्य देखील तेथे पोहचले होते.
Delhi: Late #AtalBihariVajpayee's daughter Namita Kaul Bhattacharya and granddaughter Niharika pay tribute to former Prime Minister at 'Sadaiv Atal', on his first death anniversary today. pic.twitter.com/4GG1nIONtM
— ANI (@ANI) August 16, 2019
उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील ट्विटर अकाऊंटवर अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
अटल जी भारतीय लोकतंत्र की उत्कृष्टतम परंपराओं के प्रेरणा पुंज थे, लोकतंत्र की सात्विक मर्यादाओं के मूर्तरूप थे। देश अपने मानवतावादी युगदृष्टा नेता, सहृदय और ओजस्वी शब्दशिल्पी को कृतज्ञतापूर्वक स्मरण करता रहेगा। पुण्यात्मा को मेरी विनम्र श्रद्धांजलि। pic.twitter.com/F5hC0frlag
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 16, 2019
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कारकीर्द
१९९६मध्ये अटल बिहारी वाजपेयी भारताचे पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. पण केवळ १३ दिवसातच त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळीही अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिनेच चालले. त्यानंतर १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मोदी सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना २०१४ मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.