घरदेश-विदेशजर रोगमुक्त भारत करणे गुन्हा असेल तर तो मी करणार - रामदेव...

जर रोगमुक्त भारत करणे गुन्हा असेल तर तो मी करणार – रामदेव बाबा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधावरून वाद निर्माण झाले होते. आयुष मंत्रालयाने कोरोनिल या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी बाबा रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवार बाबा रामदेव यांनी कोरोनिलवर स्पष्टीकरण दिले. हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणे हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असेही ते म्हणाले.

आपल्या शब्दांचा खेळामध्ये पडायला नको. शब्दांच्या खेळामध्ये आम्ही आयुर्वेदाला भरडू शकत नाही. आज आम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय हे औषध बाजारात आणत आहोत. लोक आमच्या औषधाची वाट पाहत आहेत. तसेच सांगितलेल्या नियमांप्रमाणेच या औषधाची चाचणी केल्याचे त्यांनी नमूद केले. आयुष मंत्रालयानेही पतंजलीची प्रशंसा केल्याचे बाबा रामदेव म्हणाले.

“कोरोनिलमध्ये गिलॉय, अश्वगंधा आणि तुळस यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण आहे. कोरोनिल आणि श्वासारी यांची संयुक्त चाचणी करण्यात आली. आम्ही याची निरनिराळी चाचणी केली नाही. पतंजली लोकांचे जीवन वाचवण्याचे काम करतो त्यांचा जीव घेण्याचे काम करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या औषधाद्वारे ३ दिवसांच्या कालावधीत ६९ टक्के रुग्ण बरे झाले. तर ७ दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला. जर रोगमुक्त भारत करने हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या जाती आणि धर्मावरुनही टीका करण्यात आली. काही जणांनी सोशल मीडियावर बाबा रामदेव यांना ७ दिवसांमध्ये तुरूंगवास होणार असल्याचेही म्हटले. आमच्या संशोधनामुळे ड्रग माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना वाटते केवळ कोट आणि टाय परिधान करणारेच संशोधन करू शकतात. हे भगवे कपडे घालणाऱ्याने कसे संशोधन केले. मी विचारतो त्यांनी काय याचा ठेका घेतला आहे का?, असेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -