एकीकडे तमाम भारतीय नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करत असतानाच तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र भारतीय जवान दहशतवाद्यांशी दोन हात करत असल्याचं समोर आलं आहे. दहशतवाद्यांशी सामना करत असताना भारतीय लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराच्या सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांच्या तुकडीचा लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी सामना झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. यामध्ये २ भारतीय जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे. अजून देखील नौशेरामध्ये धुमश्चक्री सुरूच आहे. दरम्यान, नौशेरामधली परिस्थिती जरी तणावपूर्ण झाली असली, तरी उर्वरीत काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर कलम ३७० हटवल्यापासून काश्मीरमधील बंद असलेली मोबाईल सेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काश्मीरमधील हॉस्पिटल, सरकारी शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020