घरमहाराष्ट्रनववर्षाचं स्वागत करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला

नववर्षाचं स्वागत करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला

Subscribe

या अपघातात २ तरूणांचा मृत्यू झाला असून ३ तरूण गंभीर जखमी झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशीरा २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

नववर्षाचं स्वागत करुन परतणाऱ्या एका कारला औरंगाबादमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. कार विहिरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात २ तरूणांचा मृत्यू झाला असून ३ तरूण गंभीर जखमी झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशीरा २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तरूणांनी मद्यप्राशन केलं होतं का?

नववर्षाच्या स्वागताची पार्टी करून परतलेल्या तरूणांच्या कारचा देवगिरी किल्ला परिसरात भीषण अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार जवळच्या विहिरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात सौरभ विजय नांदापुरकर (२४, रा. रोकड हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (३०, रा. पुंडलीनगर) या तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर, नितीन शिशीकर (३४, रा. रोकडा हनुमान कॉलनी), प्रतीक कापडिया (३०, रा. खाराकुंवा) आणि मधुर प्रवीण जयस्वाल (३०, रा. शहाबाजार, चेलीपूर) हे तिघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादमधील जवळच्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या तरूणांनी मद्यप्राशन केलं होतं का? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -