तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्यात आज, मंगळवारी सकाळी रस्ता अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. हा अपघात इतका विचित्र होता की, यामध्ये तब्बल २१ जण जखमीदेखील झाले आहेत. जखमी प्रवाशांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात उचिपुली येथे झाल्याचे समजते.
Tamil Nadu: 2 people killed, 21 people injured after 3 vehicles collided near Uchipuli, in Ramanathapuram district, in the early morning hours today. pic.twitter.com/7YvLB68eGf
— ANI (@ANI) March 5, 2019
भीषण अपघातात गाड्यांचा चक्काचूर
उचिपुली येथे मंगळवारी सकाळी तीन गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक कार, ट्रॉली आणि मिनी बस या तिनही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांची तातडीने बचाव कार्य सुरु केले. अद्याप अपघाताच कारण समजू शकलेलं नाही. पंरतू गाड्यांची गती अति जलद असल्याने हे अपघात घडल्याचे मानले जाते. सध्या मृतांची ओळख पटवली जात असून जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.