घरताज्या घडामोडीपाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात भारताचा जवान शहीद; तीन जण जखमी

पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात भारताचा जवान शहीद; तीन जण जखमी

Subscribe

पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात भारताचा जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. या खुरापती सुरु असताना आज पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात भारताचा जवान शहीद झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुठे झाला गोळीबार?

पूंछ जिल्ह्यात सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत छोट्या शस्त्रांनी आणि मोर्टरने हल्ला केला. सीमेला लागून असलेल्या गावांना आणि चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. रविवारी, पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पूंछमधील देगवर सेक्टरमधील एक भारतीय जवान शदीह झाले आहेत. तसेच भारतीय लष्कराचे जवानही पाकच्या गोळीबारचे प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असा दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -