घरदेश-विदेशअनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग

अनिल अंबानींच्या घराबाहेर चौकीदारांची रांग

Subscribe

मोदींचा क्रमांक पहिला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अनिल अंबानी यांच्या घरासमोर चौकीदारांची रांग लागली असून नरेंद्र मोदी पहिले उभे आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. जयपूरमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

‘तुम्ही कधी एखादा शेतकरी, कामगार किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिलय का ? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत ? तिथे चौकीदारांची रांग लागली असून मोदीजी त्या रांगेत सर्वात पहिले आहेत’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

- Advertisement -

राहुल गांधी बोलत असताना ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर राहुल गांधी काय चोरी झाली माहिती आहे का ? अशी विचारणा करत, ‘चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले. 15 लोकांचे पाच लाख 55 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. भारतातील शेतकरी, दुकानदार, तरुण यांचे एक रुपयाचं कर्ज माफ केले नाही पण 15 लोकांचे कर्ज माफ केले’ असे राहुल गांधी म्हणाले.

शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि योग्य भाव देणार असे आश्वासन दिले होते. तुमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असे आश्वासन दिले होते, अशी आठवण करून देत हीदेखील चोरीच असल्याची टीका राहुल गांधींनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -