घरदेश-विदेशराज्यसभेच्या उमेदवारांबाबत काँग्रेसमध्ये सस्पेन्स कायम, 'या' नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

राज्यसभेच्या उमेदवारांबाबत काँग्रेसमध्ये सस्पेन्स कायम, ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

Subscribe

जयराम रमेश यांच्या नावावर औपचारिक निर्णय घेण्यात आला असून, त्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयाची माहिती कर्नाटक काँग्रेसला देण्यात आली आहे. मात्र उर्वरित नावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.

नवी दिल्लीः Congress Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. परंतु अनेक नावांबाबतही अटकळ बांधली जात आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असताना काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या उमेदवारांबाबत शनिवारपर्यंत निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या नावावर औपचारिक निर्णय घेण्यात आला असून, त्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयाची माहिती कर्नाटक काँग्रेसला देण्यात आली आहे. मात्र उर्वरित नावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.

- Advertisement -

‘या’ काँग्रेस नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते

काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस अजय माकन, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राजस्थानचे माजी खासदार भंवर जितेंद्र सिंह, माजी खासदार बद्री राम जाखड, कुलदीप बिश्नोई, अजित कुमार, सुबोध कांत सहाय यांच्यासारख्या नेत्यांना राज्यसभेचे उमेदवार बनवू शकतात.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत संजय निरुपमांची खास भेट

काँग्रेसने महाराष्ट्रातूनही उमेदवार निश्चित केलेला नाही. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा यापैकी कुणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे या सर्व नावांमध्ये संजय निरुपम यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.

- Advertisement -

कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडल्यास निर्णय बदलू शकतात

G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा या दोघांनाही पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत​सपाला पाठिंबा दिला. त्याचा परिणाम उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर राजस्थानमधून गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या विचाराने राजस्थान काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे.


हेही वाचाः Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -