दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांची समाजातील ओळख अधोरेखीत करण्यासाठी महिला दिन जगभऱात साजरा केला जातो. यादिवशी विविध कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. महिलांना भेटवस्तू दिल्या जातात.
भारतीय संस्कृतीतही महिलांच्या सन्मानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. महिलांना केवळ परदेशातच नाही तर भारतातही खूप सन्मान दिला जातो. सध्याच्या घडीला भारतातील अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आज आपण त्या यशस्वी महिलांबाबत जाणून ज्यांनी सध्या भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.
भारताच्या राजकारणातील पॉवरफुल महिला
- सोनिया गांधी
सोनिया गांधी या भारतातील सध्याच्या काळातील एक यशस्वी राजकारणी महिला आहेत. सोनिया गांधींनी आपले पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाचा संपूर्ण कार्यभार संभाळला.
- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील भारताच्या राजकारणातील पॉवरफुल महिला म्हटले जाते. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाविरोधात उभ्या राहूनही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. सडेतोड आणि आक्रमक शैलीमुळे त्या सर्वपरिचित आहेत. ३४ वर्ष सत्ता गाजवलेल्या सरकारला पाडून ममता बॅनर्जी भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. सध्या भारतीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचा दबदबा दिसून येतो.
- मायावती
भारताच्या सक्रिय राजकारणात मायावती यांचे देखील आदराने नाव घेतले जाते. या उत्तरप्रदेशच्या दोन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. एक मजबूत राजकारणी म्हणून यांना ओळखले जाते.
- प्रतिभाताई पाटील
महाराष्ट्रानेही महिला नेतृत्त्वाला वाव देऊन भारताच्या उच्चपदावर विराजमान केलं. प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. राष्ट्रपती होण्याआधी त्या राजस्थानच्या १६ व्या राज्यपाल आणि प्रथम महिला राज्यपाल होत्या. १९६७ ते १९८५ पर्यंत त्या मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार होत्या. त्यानंतर त्या अमरावतीतून खासदार म्हणून निवडून आल्या. तर, २००७ साली त्यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. प्रतिभाताई पाटील या जगातील अशा एकमेव महिला राष्ट्रपती होत्या की ज्या एकही निवडणूक हरल्या नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात सुखोईसारखे लढाऊ विमान चालवले.
- निर्मला सीतारमण
भारताच्या सक्रिय राजकारणात निर्मला सीतारमण यांना देखील मानाचे स्थान आहे. निर्मला सीतारमण भारताच्या अर्थमंत्री आहेत. ही भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे.
हेही वाचा :