घरमनोरंजन'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा विकतोय चक्क बदाम थंडाई

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील राणादा विकतोय चक्क बदाम थंडाई

Subscribe

अभिनेता हार्दिक जोशीचे व्यवसायात पदार्पण

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील राणादा हे पात्र गाजले होते. राणादा म्हणजेच, अभिनेता हार्दिक जोशी हा त्याच्या सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. त्या पोस्टमध्ये त्याच्या नव्या व्यवसायाबद्दल त्याने सांगितले आहे. ‘कोल्हापूर बदाम थंडाई’ नामक देसी कोल्ड्रींस ब्रँण्ड कोल्हापूरकरांसाठी हार्दिक जोशी याने आणला आहे. हा त्याचा स्वत:चा फूड बँण्ड आहे. कोल्हापूर बदाम थंडाई ही दिनांक २५ फेब्रुवारीपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत आहे.


‘आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केले. आता मी एका नवीन व्यवसायात पदार्पण करत आहे.या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझासोबत राहील हा मला विश्वास आहे. कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रुवारीपासून आपल्या सेवेत,मग काय येणार नव्हं? यायला लागतंय,चालतंय की,’ असं कॅप्शन लिहित हार्दिकने त्याच्या फूड बँण्डचा आस्वाद घ्यायला आवर्जून बोलवले आहे.

- Advertisement -

२०१५ मध्ये ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिक जोशी याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हार्दिक जोशीने क्राइम पेट्रोल,अस्मिता या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला. मात्र त्याला खरी ओळख ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळेच मिळाली. हार्दिक जोशीच्या ‘राणादा’ या पात्राला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.


हेही वाचा – राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -