घरमनोरंजनदयानंतर टप्पू सोडणार 'तारक मेहता का उल्टा चष्मा'?

दयानंतर टप्पू सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’?

Subscribe

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता या मालिकेतून टप्पूची भूमिका साकरणारा अभिनेता राज अनादकट सुद्धा मालिका सोडणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरूल लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतून काही महिन्यांपूर्वी दयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी, तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांसारख्या अनेक कलाकारांनी या मालिकेतून काढता पाय घेतला. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता या मालिकेतून टप्पूची भूमिका साकरणारा अभिनेता राज अनादकट सुद्धा मालिका सोडणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दया आणि जेठालालचा मुलगा टप्पू ही भूमिका साकारणारा अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेत दिसून आला नाही आणि ही गोष्ट तेव्हा लक्षात आली जेव्हा त्यांची संपूर्ण टीम १४ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत होते. त्यावेळी टप्पू या पार्टीमध्ये दिसून आला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

- Advertisement -

दरम्यान, आता याबाबत राज अनादकटने स्वताः खुलासा केला आहे. एका मुलाखतीत राजला विचारण्यात आलं की, तू मालिका सोडली आहेस का? त्यावर तो उत्तर टाळत म्हणतो की, “मला नेहमीच सरप्राईज द्यायला आवडतं. येत्या काळात मी तुम्हाला ते सांगेनचं” असं राज म्हणाला होता. राज अनादकटने २०१७ पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये टप्पूची भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती.


हेही वाचा :‘प्रीत अधुरी’ लवकरच होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -