अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्यावर चित्रपटसृष्टीत नाव कामावल आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी अपलं विशेष प्रस्थ निर्माण केलं आहे. 90 दशकाचा काळ त्यांनी अगदी गाजवला होता. आपल्या प्रोफेशनल आयुष्या व्यतीरिक्त नानाच्या खाजगी आयुष्यातील चर्चा देखील तितक्याच रंगत असायच्या अभिनेत्री मनिषा कोईराला आणि नाना पटेकर यांच्यातील प्रेम संबंधाच्या चर्चणा देखील उधाण आले होते. इतकेच नाही तर एक अवॉर्ड सोहळया दरम्यान नाना पटेकर यांनी चक्क याचा खुलासा केला होता. 1996 मध्ये ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केलं आणि त्यांच्यात जवळीक वाढू लागली असे बोलण्यात येते. नाना यांची पर्सनॅलिटी,स्टाईल मनीषाला पसंत पडली होती. आणि त्या दरम्यान नुकताच मनीषा आणि अभिनेता विवेक मुशरानचा यांचा ब्रेकअप झाले होते. यामुळे नाना आणि मनीषा दिवसेनंदिवसएकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि इतकेच नाही तर त्यांच्या घट्ट मैत्री निर्माण झाली काही दिवसातच या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. दोघांच्याही प्रेमप्रकरणाच्या बातम्या लोकांमध्ये पसरू लागल्या आणि लोकांनी दोघांना थेटर मध्ये पहण्यास एकच गर्दी केली.
‘अग्निसाक्षी’ या सुपरहिट चित्रपटानंतर दोघांनीही पुढे ‘खामोशी’ या चित्रपटात झळकले होते. दोघांनाद्धे इतकी जवळीक वाढू लागली की मनीषा नाना पटेकर याच्या घरातूनं बर्याच वेळा बाहेर पडताना पहिले होते असे एका मीडिया रिपोर्ट नुसार सांगण्यात आले आहे. या वृत्ताला दुजोरा देत नाना यांनी एका मुलाखती मध्ये म्हणाले होते.”मनीषा अनेकदा माझ्या आई व मुलाला भेटण्यासाठी येत असे आणि माझे कुटुंबही तिला प्रेमाने भेटायचे”
मनीषा आणि नाना दोघांचाही स्वभाव भरपूर रागीष्ठ आणि तापट होता बर्याचदा त्यांच्यात वाद होत असे. दोघेही एकत्र असताना नाना त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते मात्र ते मनीषा सोबत लग्न करण्यासतही अद्याप तयार नव्हते या वागणुकीमुळे अनेकदा दोघांमध्ये खटके उडत असे. मनीषाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला पुढे जाऊन मुवऑन केले. मात्र नाना मनीषाला विसरले नाही. ‘फिल्मफेअर’ मध्ये दिलेल्या मुलाखती दरम्यान नाना म्हणाले होते की,”मनीषा कस्तुरी हरणाप्रमाणे आहे. तिने समजून घेणे आवश्यक आहे की तिला कोणाबरोबर राहण्याची गरज नाही. तिच्याकडे सगळं काही आहे गरजेपेक्षा जास्त. तसेच ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आज ती स्वत: सोबत काय करत आहे हे पाहून माझे अश्रु अनावर होतात. मला आज तिच्याबद्दल काही बोलायचे नसले तरी ब्रेकअप हा सगळ्यात कठीण काळ आहे. मी ज्या दु:खातून गेलो ते मी कोणालाही सांगू शकत नाही. मला मनीषाची आजही आठवण येते.”
हे हि वाचा – बबीताजीच्या संकटात वाढ,अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत मुनमुन दत्ता विरोधात गुन्हा दाखल !