सलमान खान प्रॉडक्शनच्या लवरात्री या चित्रपटाचं नावात बदल करण्यात आला आहे. लवरात्री हे नाव बदलून लवयात्री असं नामकरण करण्यात आलं आहे. पुन्हा या चित्रपटाच्या नावावरून वाद होऊ नये. चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण होऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
काय झाला होता वाद
आयुष शर्मा आणि वरिना हुसैनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘लवरात्री’ असं ठेवण्यात आलं होतं. पण या नावावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. ‘लवरात्री’च्या पोस्टर्सची होळी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बिहारमधील एका वकिलाने या चित्रपटाच्या शीर्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. हे शीर्षक हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आहेत. असा आरोप त्यात केला होता. तर या वादानंतर उत्तर प्रदेशातील हिंदू ही आगे या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख गोविंद पराशर यांनी सलमानला भर रस्त्यात मारणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केलं होतं. या सगळ्या वादानंतर अखेर सलमानने या चित्रपटाचं नाव बदलले.
काय आहे चित्रपटाची कथा
गुजरातच्या पार्श्वभूमीवर ‘लवरात्री’ हा रोमॅन्टीक चित्रपट आधारीत आहे. ट्रेलर बघितल्यावर कळतं वरीना गुजरातमध्ये येते आणि तीची भेट आयुषसोबत होते. मग या दोघांची मैत्री होते आणि नंतर त्यांच्यात प्रेम होतं. पण त्यांना पुढे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
This is not a spelling mistake… #loveyatri #lovetakesover…@SKFilmsOfficial @aaysharma @Warina_Hussain @abhiraj21288 @TSeries pic.twitter.com/WcI5tbXkke
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 18, 2018
मंगळवारी रात्री सलमानने ट्वीटरवरून चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत चित्रपटाचे नाव बदलण्याचे जाहीर केलं. ही ‘स्पेलिंग मिस्टेक नाही’ असं सलमानने लिहीत हे पोस्टर जाहीर केलं.