गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा इटलीत विवाह सोहळा पार पडला. लग्ना आधी दोघांनी एकत् कपड्याच्या ब्रँडसाठी जाहिरात केली होती. आता एका वर्षानंतर पुन्हा एकदा जाहीरातीत झळकणार आहेत. नुकतीच या जाहिरातीची झलक विरूष्काच्या फॅनच्या समोर आली आहे.
काय खास आहे जाहीरातीत
यावेळी जाहिरातीत विराट आणि अनुष्का यांच्या मित्रांचे लग्न होत आहे आणि त्यात ते दोघेही त्यांना लग्न करू नका असा देताना दिसतायत. अनुष्का म्हणते की, “बघ, विचार कर. महिन्यातले १५ दिवस तो जेवण बनवणार असं सांगेल. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा होम डिलिव्हरी करेल.” यावर विराट बोलतो की, “टी. व्ही. चा रिमोट, एसीचा रिमोट, आयुष्याचा रिमोट… सर्व काही हातातून निघून जाईल.”
ही जाहीरात जरी असली तरी नक्कीच हे त्यांच्या एक वर्षाच्या अनुभवयाचे बोल आहेत असं म्हणायला हरकत नाही. मात्र पुन्हा एकदा या जाहीरातीतून या दोघांची खास केमिस्ट्री दिसत आहे. कदाचित त्यांच्या लुटूपुटूच्या भांडणामुळेच या दोघांचं नातं खुलून दिसतय हे निश्चित.
अनुष्काने Instagram वर या जाहिरातीचा व्हिडियो शेअर केला आणि लिहिले की, “Celebrating love everyday #SaathSaathHamesha.”
View this post on Instagram
Celebrating love everyday #SaathSaathHamesha ✨? @manyavarmohey @virat.kohli
ही जाहिरात शशांक खायतन यांनी दिग्दर्शित केली आहे. करण जौहरने या जाहिरातीची ट्विटरवर स्तुती केली आणि लिहिले की “खूप सुंदर जाहिरात आहे ही शशांक! आणि विराट हा चांगला अभिनेता आहे !!! अनुष्का आणि तो जाहिरातीमध्ये एकत्र चमकत आहेत!”
Lovely ad Shashank! And Virat is such a good actor!!!! Anushka and him sparkle in the ad! https://t.co/RcXgtSpwy3
— Karan Johar (@karanjohar) November 20, 2018
२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिराती निमित्त विराट आणि अनुष्का यांनी एकत्र काम केले. तेव्हापासून त्यांच्यात प्रेम खुलले. शेवटी १२ डिसेंबर २०१७ रोजी इटलीच्या टस्कनी जवळील बॉर्गो फिनोचियेटो रिसॉर्ट येथे त्यांचा लग्न सोहळा पार पडला.