घरलाईफस्टाईलजेवताना पाणी पिणे योग्य की अयोग्य?

जेवताना पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Subscribe

'या'साठी जेवताना पाणी पिणे टाळा

जेवताना अनेकांना पाण्याचा ग्लास घेऊन बसण्याची सवय असते. कारण काहींना जेवताना अगदी पाणी गरजेचे असे देखील वाटते. त्यामुळे जेवताना अनेक जण पाणी घेऊन जेवायला बसतात. परंतु, जेवताना जर तुम्ही पाण्याचा सेवन करत असाल तर ते फार धोकादायक आहे. त्याची नेमकी कोणती कारणे आहेत पाहूया.

लाळनिर्मिती संथ होते

- Advertisement -

पचनक्रियेची सुरुवात ही लाळेतून होते. त्यातील एन्जाईम्स अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात. त्याचबरोबर पोटातील डायजेस्टिव्ह एन्जाईम्सना चालना देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. पण, जर तुम्ही पाण्याचे सेवन केल्यास पाण्यामुळे लाळ धुवून जाते. त्यामुळे अन्नाचे विघटनही होण्याची प्रक्रिया संथ होते.

पित्तासह छातीत जळजळ होणे

- Advertisement -

तु्म्हाला पित्ताचा त्रास असल्यास जेवताना पाण्याचे सेवन करणे शक्यतो टाळा. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते आणि पित्त वाढणे, छातीत जळजळ वाढणे, असे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

गॅस्ट्रिकचा नाश होतो

खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करुन शरीराला उर्जा पुरवण्याचे प्रमुख काम पोटातील एंजाईम्स करत असतात. पण, जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो, तेव्हा पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा समस्या अधिक उद्भवतात.

साखरेचे प्रमाण वाढते

जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते. कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन शरीरात काही घटन मेदाच्या स्वरुपात शरीरात साठून राहतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

वजन वाढते

जेवताना पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच अन्नपदार्थांचे पुरेसे विघटन न झाल्याने शरीरात अतिरिक्त फॅट साचून राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -