राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ६४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २६६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Maharashtra reported 8,641 new COVID-19 cases and 266 in the last 24 hours, taking active cases to 1,14,648 and death toll to 11,194. A total of 1,58,140 patients have recovered so far. Mumbai has the highest number of cases at 97,950: State Health Department pic.twitter.com/oKVwlrrhro
— ANI (@ANI) July 16, 2020
राज्याचा रिकव्हरी रेट ५५.६३ टक्के
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक जण कोरोनावर देखील मात करत आहे. आज राज्याचा रिकव्हरी रेट ५५.६३ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत १ लाख ५८ हजार १४० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
२ लाख ८४ हजार २८१ पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यात आतापर्यंत १४ लाख ४६ हजार ३८६ नमुने घेण्यात आले असून यापैकी २ लाख ८४ हजार २८१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ७ लाख १० हजार ३९४ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर ४२ हजार ८३३ व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा – ‘या’ चित्रपटावर बंदी घालावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी