घरठाणेAlphonso : हापूसच्या नावाखाली केमिकलयुक्त कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी

Alphonso : हापूसच्या नावाखाली केमिकलयुक्त कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी

Subscribe

नवी मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना आवडणार्‍या हापूस आंब्याची चव चाखावीशी वाटते. परंतु तुम्ही बाजारात हापूस घेत असाल तर, आता सावधान असणे आवश्यक आहे. तुर्भेतील एपीएमसीच्या बाजारात काही व्यापार्‍यांकडून हापूस आंब्याच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री सुरू आहे. हापूस आंब्याच्या पेटीला असणारा भाव या केमिकलयुक्त बनावट हापूसला लावून ग्राहकांची लुटमार केली जात आहे. शिवाय, यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी देखील खेळ होत आहे.

एपीएमसीच्या फळ बाजारात उन्हाळ्यातील रसदार कैरी, आंबा, द्राक्षे, कलिंगड या फळांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आहे. एपीएमसीत सध्या अस्सल देवगडचा हापूस आंबा हा 800 ते 1000 रुपये डझनने विकला जातो तर, कर्नाटक हापूस आंबा हा 80 ते 100 रुपये किलोने विकला जात आहे. ग्राहकांकडून देवगडच्या आंब्याला जास्त मागणी असते. पण या आंब्यांची आवक कमी असल्याने एपीएमसी मार्केटमधील देवगड आंब्यांच्या पेटित कर्नाटकी आंबा भरून हापूस असल्याचे भासविले जाते आणि त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

केमिकल इथरेलद्वारे पिकवलेला आंबा हा वरून पिवळा दिसतो. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट-आंबट लागते. त्यामुळे चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्यासोबतच खेळ खेळला जात आहे. रायपनिंग चेम्बरमध्ये इथरेलच्या फवारणीसाठी मान्यता आहे, परंतु तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, गुंगी येणे, झोप लागणे आणि मानसिक तणावासोबतच चेतनासंस्थेवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत बाजार समितीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

बंगाली टोळी कार्यरत
सध्या फळ मार्केटमध्ये आंब्याच्या हंगामात चार महिने बंगाली टोळी बाजारात उतरली आहे. रात्रीच्या वेळी बाजारात या कामगारांचा वावर सुरू असतो. फळ बाजारात रात्रीच्या वेळी कॅरेटमधून आलेले कर्नाटकी कच्चे आंबे गाळ्यात उतरविले जातात. त्यानंतर देवगडचे लेबल असणार्‍या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये केमिकलची फवारणी करून कर्नाटकी आंबे त्यात ठेवले जातात. अशा रीतीने बनावट देवगड हापूस आंब्याची पेटी तयार केली जाते. दोन दिवसांत हा हिरवागार आंबा पिवळा धमक होतो आणि त्यानंतर लगेच याची विक्री केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -