घरताज्या घडामोडी'रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं...

‘रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं !’ अमृता फडणवीसांच नवं ट्वीट

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीसदेखील आले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मात्र पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर केलेलं वक्तव्य आणि आता त्यांनी केलं हे नवं ट्विट.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी एक शायरी ट्विट केली आहे.  त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जे लोकं काचेच्या महालात रहतात ते इतरांपासून अंतर राखून राहतात. पण आम्ही दगडापासून तयार केलेल्या घरात राहतो. पण काचेच्या घरात राहणारे विसरले आहेत की काचेच्या घरातील काही लपून रहात नाही. पण आम्ही सत्य कायम जवळ घेऊन फिरतो.

हे ट्वीट करताना त्यांनी जय श्रीराम, जस्टीस फॉर सुशांत, दिशा हे टॅग वापरले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी त्या वक्तव्यावरून झालेला वाद

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटनंतर त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.


हे ही वाचा – सावधान! Netflix तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -