घरमहाराष्ट्रशरद पवारांची साक्ष घ्या!

शरद पवारांची साक्ष घ्या!

Subscribe

भीमा-कोरेगाव प्रकरण ,वकिलाची चौकशी आयोगाकडे मागणी

भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीला अनपेक्षित वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी भीमा-कोरेगावप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी चौकशी आयोगाकडे केली आहे. अ‍ॅड. गावडे यांनी तसा अर्जही केला आहे. त्यावर चौकशी आयोग खरंच शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावणार का, याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद अचानक चर्चेत आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सरकारमधील घटक पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात आणि महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा उल्लेख नसताही हे मुद्दे शरद पवार यांनी उपस्थित केले. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा आणि त्यात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठक घेतली होती. पण, त्यानंतर काही तासातच हे प्रकरण केंद्र सरकारने ‘एनआयए’कडे सोपवले. त्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतरही याप्रकरणावर वारंवार भाष्य केले आहे. दोन दिवसापूर्वीच पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर अ‍ॅड. प्रदीप गावडे त्यांची साक्ष घेण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. त्या काळात जे युद्द झाले त्यात पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही भारतीयही होते हे यावरुन स्पष्ट होते. इथे दरवर्षी लोक येतात.

- Advertisement -

इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणार्‍यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळे वातावरण निर्माण केले, असे पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीने साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -