महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवार आणि शुक्रवारी राज्यात २५ हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी हा आकडा अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले. आज राज्यात २७ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील दोन दिवसांपेक्षा हा आकडा साधारण दीड हजाराने वाढला. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख १८ हजार ४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ७ हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 27,126 new #COVID19 cases, 13,588 recoveries and 92 deaths in the last 24 hours.
Total cases 24,49,147
Total recoveries 22,03,553
Death toll 53,300Active cases 1,91,006 pic.twitter.com/RkwOd7VmWZ
— ANI (@ANI) March 20, 2021
९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.१८ टक्के इतका आहे. आज दिवसभरात राज्यात १३ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत २२ लाख ०३ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ८९.९७ टक्के इतका झाला आहे.
मुंबईत २ हजार ९८२ नवे रुग्ण
मुंबईत शनिवारी दिवसभरात २ हजार ९८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात झाली. तर १ हजार ७८० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मुंबईत ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २१ हजार ३३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.