घरताज्या घडामोडीअडीच वर्षाचं सरकार बंदिस्त असूनही वसुलीचा उच्चांक गाठला, फडणवीसांचा ठाकरेंना टोला

अडीच वर्षाचं सरकार बंदिस्त असूनही वसुलीचा उच्चांक गाठला, फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Subscribe

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. भाजपकडून तीन मतदार संघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, अडीच वर्षाचं सरकार बंदीस्त असूनही त्यांनी वसुलीचा उच्चांक गाठला, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. सहा महिन्यांपूर्वी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आलं. त्यानंतर सरकार काय असतं, याची जाणीव जनतेला व्हायला लागली. मागील अडीच वर्षांचं सरकार बंदीस्त होतं, दाराआड होतं. तसेच हे सरकार फेसबुक लाईव्हवर होतं. मात्र, त्या सरकारमध्ये केवळ वसुली दिसत होती. अडीच वर्षाचं सरकार बंदीस्त असूनही त्यांनी वसुलीचा उच्चांक गाठला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

अडीच वर्षामध्ये मंत्र्यांपासून सर्वच तुरूंगात दिसले. वर्क फ्रॉम होम आपण पाहिलं होतं. पण वर्क फ्रॉम जेल हा नवीन प्रकार आपल्याला अडीच वर्षात बघायला मिळाला. कारण तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत आणि नैतिकता नव्हती की, जेलमधल्या मंत्र्याचा ते राजीनामा घेतील. शेवटी काय झालं, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले आणि तेव्हाच त्यांचा कारभार बंद झाला, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : आजचे सरकार शिक्षकांबाबत गांभीर्याने विचार करत नाही, जयंत पाटलांचा हल्लाबोल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -