घरदेश-विदेशदिल्ली हिंसाचार दंगल नसून हल्ला - प्रकाश आंबेडकर

दिल्ली हिंसाचार दंगल नसून हल्ला – प्रकाश आंबेडकर

Subscribe

आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

दिल्लीमध्ये गेले चार दिवस सीएए कायद्यावरुन हिंसाचार झाला. गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली हिंसाचारासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. दिल्लीमधील हिंसाचार ही दंगल नसून हा हल्ला असल्याचे प्रकाश आबेडकर म्हणाले. दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. “काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसने आणि आता भाजपचे सरकार असताना भाजप संघाच्या कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

दिल्ली हिंसाचारावरुन केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढणारे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली दिल्ली न्यायालयातून पंजाब आणि हरियाणा न्यायालयात केली. यावर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी टीका केली आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबैठकीत हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे.


हेही वाचा – न्या. एस मुरलीधर यांची बदली हे भाजपचे षडयंत्र – सुरजेवाला

दिल्ली हिंसाचाराकडे केंद्र सरकारची डोळेझाक – सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग देखील त्यांच्यासोबत होते. दिल्लीत तीन दिवस हिंसाचार सुरु असताना केंद्र सरकारने याकडे डोळेझाक केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -