घरमहाराष्ट्रशीख समुदायासाठीचा आनंद विवाह कायदा लागू करण्याची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

शीख समुदायासाठीचा आनंद विवाह कायदा लागू करण्याची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Subscribe

मुंबई – शीख समुदायातील विवाहासंबंधित आनंद विधींसाठी राज्य सरकारने नियमावली निश्चित करण्याची मागणी करत एका शीख दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आनंद विवाह कायदा 1909 नुसार हे नियम निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हा कायदा महाराष्ट्रा बरोबर दहा राज्यांमध्ये लागू करण्यात आला असून त्याचे नियमही निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये पंजाब, केरळ, आसाम, राजस्थान, दिल्ली इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

याचिकेत काय –

- Advertisement -

शीख समाजातील विवाह सोहळ्यात आनंद कारज नावाचा एक विधी असतो. यानुसार त्यांच्या विवाहाची नोंदणी स्वतंत्रपणे केली जाते. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याची अमंलबजावणी झालेली नाही. ती न झाल्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना हिंदू विवाह कायद्यानुसारच नोंदणी करावी लागते, अशी तक्रार याचिकेतून केली आहे. आनंद कारज विधीनुसार विवाह झाल्यावरही त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते. मात्र, महाराष्ट्रात अद्याप हा कायदा लागू केला न जाणे दुर्दैवी आहे अशी खंत या याचिकेत नमूद केलेली आहे.

शीख समाजातील विवाह सोहळ्यात आनंद कारज नावाचा एक विधी असतो. यानुसार त्यांच्या विवाहाची नोंदणी स्वतंत्रपणे केली जाते. मात्र, राज्यात अध्याप याची अमंलबजावणी झालेली नाही. ती न झाल्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार नोंदणी करावी लागते, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. आनंद कारज विधीनुसार विवाह झाल्यावरही त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते. मात्र महाराष्ट्रात अद्याप हा कायदा लागू केला न जाणे दुर्दैवी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकरणात याचिकादार पती-पत्नीने मागील वर्षी औरंगाबादमधील भाई दया सिंह गुरुद्वाऱ्यात विवाह केला होता. पण आनंद विवाह कायदा राज्यात लागू नसल्यामुळे त्या कायद्यानुसार नोंदणी करता आली नाही असे त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार तो लागू करावा अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.

आनंद कारज म्हणजे काय? –

शीख धर्मात लग्नाला आनंद कारज म्हणतात. आनंद कारजसाठी लग्न, मुहूर्त, शगुन-अशुभ, नक्षत्रांची गणना, जन्मकुंडली तयार करणे आणि जुळवणे याला विशेष महत्त्व नसते. तर हिंदू विवाहात या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. देवावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी आनंद कारजचे सर्व दिवस पवित्र मानले जातात. आनंद कारजमध्ये गुरुग्रंथसाहिबसमोर चार फेरे किंवा लावण करुनच शिखांचे लग्न पार पाडले जाते. तर हिंदू विवाहात सात फेरे घ्यावे लागतात. या सर्व कारणांमुळे शीख विवाह हिंदू विवाह कायद्यांतर्गत होणाऱ्या विवाहांपेक्षा वेगळे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -