नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगावात मेळावा संपन्न झाला. यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री यांना टोला लगावला. मी जर बोललो तर महाराष्ट्रात भूकंप होईल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी घेतलेल्या निर्णयांचा तसेच प्रस्तावित कामांची माहितीही दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री
- उध्दव ठाकरेंनी भूमिका समजून न घेतल्याने उठाव केला
- अनेकवेळा उध्दव ठाकरेंकडे भूमिका मांडली.
- आम्ही उठाव केल्यावर आम्हाला गददार म्हटले सत्तेसाठी विश्वासघात कुणी केला ?
- मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा
- विश्वासघात कोणी केला हा विचार करावा
- धर्मवीरांबाबत जीवनात जे झालं त्याबाबत योग्य वेळी बोलेन
- दिघेंबाबत काय राजकारण केले ते योग्य वेळी बोलेनं
- जे अडीचवर्षांपुर्वी व्हायला हवे होते ते आता केले झालेली चुक आता दुरूस्त केली.
- पुढील निवडणुकीत दोनशे आमदार निवडुन आणणार
कुठल्या कामांची घोषणा ?
- पश्चिम वाहिनी नद्यांच पाणी वळवण्याबाबत निर्णय घेतला
- रिक्षाचालक, फेरीवाले, हॉकर्स यांचे महामंडळ स्थापनार