घरमहाराष्ट्रएन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात, 'या' अधिकाऱ्यांचीही बदली

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात, ‘या’ अधिकाऱ्यांचीही बदली

Subscribe

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक (Daya Nayak) यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सध्या ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दया नायक यांच्याशिवाय अजून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

2021 मधील अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर दया नयाक यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. ही बदली प्रशासकीय असल्याचे सांगितले गेले; मात्र बदलीच्या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.

- Advertisement -

दया नायक यांच्याशिवाय दहशतवादविरोधी पथकातून पोलीस दलात अजून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचाही समावेश आहे, तर यापूर्वी मुंबई पोलीस दलातून अन्य विभागात बदली दाखवलेल्या नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून अनेक एन्काऊंटरही केले असल्यामुळे त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही आहे. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेत या बदलीला आव्हान दिले होते.

- Advertisement -

दया नायक यांच्याविषयी
दया नायक यांची 1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. त्यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला. याशिवाय जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.
दया नायक यांची कारकिर्द वादग्रस्तदेखील ठरली. बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अॅन्टी करप्शन ब्युरोने त्यांना अटक केली होती. पुढे अॅन्टी करप्शन ब्युरोने कोणतेही पुरावे न दिल्याने नायक यांना या प्रकरणात क्लिन चीट मिळाली. 2012 मध्ये नायक पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली होती. मात्र नागपूरला रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई 2016 मध्ये मागे घेत त्यांची मुंबईत पोस्टिंग करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -