घरताज्या घडामोडीसमाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेले पत्र बनावट; आप्पासाहेब धर्माधिकारींकडून खुलासा

समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेले पत्र बनावट; आप्पासाहेब धर्माधिकारींकडून खुलासा

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात 10 हून अधिक श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. श्री सदस्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. अशातच शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात 10 हून अधिक श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. श्री सदस्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. अशातच शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावड असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र शनिवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. (Fake Letter Name Of Appasaheb Dharmadhikari Is Viral On Social Media)

- Advertisement -

या बनावट पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. तसेच, ”माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका”, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, समाजमाध्यमांवर हे पत्र प्रसारित झाल्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे पत्र बनावट असल्याचे सांगितले. याशिवाय, कोणीतरी खोडसाळपणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करून हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले.

पत्र बनावट असल्याचे समजतात या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समजते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे समजते.


हेही वाचा – ‘मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतोय’, घर सोडताना राहुल गांधी भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -