घरताज्या घडामोडीजुन्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

जुन्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Subscribe

जुन्या वादातून मित्रानेच मित्राची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा येथे घडल्याचे समोर आले आहे.

जुन्या वादातून मित्रानेच मित्राची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव हरिनाम नगर येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर बापू उर्फ राजेश गुप्ता (२५) असं मृतकाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

हरिनाम नगर येथे सकाळच्या सुमारास राजेश हा आपल्या अंगणात उभा असताना आरोपी सागर कांबळे हा तिथे आला. तिथे दोघांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली. काही कळायच्या आत सागरने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने राजेशच्या गल्यावर, पोटावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राकेश जागेवर कोसळला. अतिरक्त स्त्राव आणि चाकूचे घाव खोलवर गेल्यामुळे त्याने जागेवरच जीव सोडला. सागर हा राजेशला मारहाण करत असल्याचे पाहताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवत तिथून पळ काढला.

- Advertisement -

दरम्यान, आरोपी आणि मृतक हे सोबत काम करत असल्याची माहिती समोर आली असून दोघांचे नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाला होता. याचाच वचपा काढत आरोपीने चाकूने वार करत हत्या केली. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.


हेही वाचा – कोरोना काळात Job गेलाय? मग सरकारच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हा, नोकरी मिळवा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -