घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील वायू प्रदूषणात वाढ; मुंबई, दिल्लीच्या तुलनेत हवा जास्त खराब

पुण्यातील वायू प्रदूषणात वाढ; मुंबई, दिल्लीच्या तुलनेत हवा जास्त खराब

Subscribe

पावसाळ्यानंतर देशातील अनेक राज्यांमधील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असून मुंबई आणि दिल्लीपेक्षा पुण्याची हवा खराब असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : पावसाळ्यानंतर देशातील अनेक राज्यांमधील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असून मुंबई आणि दिल्लीपेक्षा पुण्याची हवा खराब असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हवेमध्ये अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढल्याने पुण्याच्या वायू प्रदूषणात वाढ झाल्यात सांगण्यात आले आहे. परंतु, या वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना सर्वाधिक त्रास होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेला असून मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर पोहोचला आहे. (Increase in air pollution in Pune; Air is worse than Mumbai, Delhi)

हेही वाचा – Lalit Patil Drugs case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; ललित पाटीलच्या दोन मैत्रिणीही अटकेत

- Advertisement -

मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या आधी राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती समोर येत होती. परंतु, आता दिल्लीपेक्षा मुंबई आणि पुण्यातील हवा खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक 110 वर आहे. मुंबई आणि पुण्यात पीएम 2.5 कणांची मात्रा अधिक असल्याचे सफरच्या म्हणजेच The System of Air Quality and Weather Forecasting And Research यांच्या अभ्यासात समोर आले आहे.

प्रदूषणातील ही वाढ तापमानात घट झाल्यानंतर नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि हवेत कोरडेपणा जास्त असतो. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुले या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील सर्वात जास्त कारणीभूत ठरते. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, कँसर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा आणि हृदय रोगांच्या रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. तर, हिवाळ्यात पूर्वेकडून वाहणारे वारे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील कमी असल्याने मुंबईसह पुण्यातील हवा गुणवत्ता खालवली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था, मुंबई शहरात सुरू असलेली बांधकामे, मेट्रोची कामे यामुळे धुळीच्या कणांमुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -