घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का? सीमावादावरून जयंत पाटील कडाडले

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का? सीमावादावरून जयंत पाटील कडाडले

Subscribe

मुंबई – सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत, याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या सर्वांवर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा – हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकांचा निकाल आज लागणार, भाजपा सत्ता कायम ठेवणार का?

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे, अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात जयंत पाटील शिंदे – फडणवीस सरकारवर यांनी हल्लाबोल केला.


कॉंग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळला

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळला आहे. याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशानतही उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल यावरून संसदेत प्रश्न उपस्थित करताच गोंधळ निर्माण झाला. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर संसदेत चर्चा होऊ नये अशी मागणी कर्नाटकच्या खासदारांनी केली. मात्र, सुप्रिया सुळे आणि अरविंद खासदार आपल्या मागणीवर ठाम होते. त्यांनी महाराष्ट्राची बाजू संसदेत उचलून धरली. अखेर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही खासदारांना शांत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -