मुंबई – आशीष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा घणाघात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. शेजारच्या गल्लीमध्ये मांजरीने बाळं दिली तरी सांगितील की ही शिवसेनेमुळे झाली, इतकं त्यांचं डोकं फिरलेलं आहे, अशी टीका पेडणेकरांनी केली. आशीष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवर पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. यावरून भाजपाने उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का असा सवाल आशीष शेलार यांनी ट्विटरद्वारे विचारला होता. यावरुन किशोरी पेडणेकर यांनी आशीष शेलारांवर हल्लाबोल केला आहे.
हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता..
सांग सांग भोलानाथ…
हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून..
अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून..
सोशल मिडियावर “पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या” पेंग्विन सेनाप्रमुखांकडून…
वसूल करायचा का?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 13, 2022
मला असं वाटतं लवादा हा राज्य सरकारच्या अकत्यारित येतो हे नक्कीच आहे. मुंबई महानगरपालिकेने कचरा सिस्टिमवर अनेकदा काम केलंय, त्याचं तुम्ही स्वतः कौतुक केलं आहे. प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशीष शेलार असतील म्हणून त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.