राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाची दहकता आता कमी झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 113 नवे रुग्ण आढळून आहेत. तर अॅटिव्ह रुग्णांची संख्या देखील हजारांच्या खाली पोहचली आहे. राज्यात सध्या 714 अॅटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच गेल्या 24 तासात राज्यात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,तर 127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आज झालेल्या चार कोरोना मृतांमुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहेय. तर आत्तापर्यंत 77,26, 790 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 97, 31, 899 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईचा विचार केला असता मुंबईत आज 52 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर मुंबईतील कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या 309 झाली आहे. याशिवाय मुंबईत कोरोनाच्या एकाही मृताची नोंद झालेली नाही. तर मुंबईत आज 56 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आजपर्यंत 10,38,625 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 98 टक्के झाले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 16537 दिवसांवर पोहचले आहे. तर 4 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत कोरोनाचा ग्रोथ रेट 0.004 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates
12th April, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 52
Discharged Pts. (24 hrs) – 56Total Recovered Pts. – 10,38,625
Overall Recovery Rate – 98%
Total Active Pts. – 309
Doubling Rate -16537 Days
Growth Rate (5th April- 11th April)- 0.004%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 12, 2022