घरताज्या घडामोडीमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना रोखण्यात यश - मुख्यमंत्री

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना रोखण्यात यश – मुख्यमंत्री

Subscribe

डिसेंबर महिन्यात ही मोहिम परिणामताकपणे राबविण्याचे नियजोन करण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. दिवाळीनंतरचे १५ दिवस हे जागरूकतेचे असतील त्यासाठी या आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

कोरोनाचा रूग्णसंख्या आणि मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे. असं असलं तरी या बाबत गाफिल राहून चालणार नाही. युरोप प्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला कराण्याची तयारी असू द्या असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. माझे कुटुंब, माझी जवाबदारी या मोहिमेमुळे आपण कोरोना संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहेत. डिसेंबर महिन्यात ही मोहिम परिणामताकपणे राबविण्याचे नियजोन करण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. दिवाळीनंतरचे १५ दिवस हे जागरूकतेचे असतील त्यासाठी या आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे,मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि टास्क फोर्सचे डॉक्टर्सही सहभागी झाले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री या वेळी म्हणाले की,हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो. इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू मिळविण्यासाठी लढलो. त्यामुळे आपल्याला यश येते आहे असं दिसत आहे. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करतो आहोत. सुरुवातीच्या काळात विषाणूची ठिकाण मर्यादित होती. शहरांत असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत. कारण आपण आरोग्यविषयक योग्य खबरदारी पाळली होती. मात्र आत्ता थंडी सुरू झाली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्युमोनिया, अस्थमा, फ्ल्यू सारखे आजार आपली डोकी वर काढतात.त्यामुळे रुग्णांनी आता अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुपर स्प्रेडच्या चाचण्या करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. जास्त लोकांच्या संपर्कात येणारे बस चालक तसेच सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतात. त्यामुळे त्यांनी लगेचच या चाचण्या करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाल आहे त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सची आढावा घ्या त्याचप्रमाणे कर्मचारी कमी करू नका थोडी विश्रांती घेऊन तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असंही बैठकीदरम्याम मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूनमिवर नियमांचे काटेकोरपणे पालन करा. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल,असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही संवाद साधला. आज आपल्याकडे ५०० प्रयोगाशाळा असताना चाचण्या देखील वाढल्या पाहिजेत. काही जिल्ह्यांत एंटीजेनच्या ऐवजी आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्यावा लागेल. गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. काही जिल्ह्यात अजून मृत्यू दर जास्त आहे त्यामुळे प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे आहे असं आरोग्यमंत्री म्हणाले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मुळे राज्यात ५० हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले आहेत शिवाय सह व्याधी रोग्यांची माहिती पण शासनाकडे आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून कोरोना संसर्ग त्यांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल. नंदुरबारसारख्या दूरच्या जिल्ह्यात देखील मोबाईल एपचा चांगला वापर करून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली दुसरी लाट आली तर ४० टक्के रुग्ण विलगीकरणात तर ४५ टक्के कोविड केंद्रात असतील तर १५ टक्के रुग्णांना आयसीयूची गरज असेल अशी अपेक्षा आहे. आजमितीस केवळ १ लाख सक्रीय रुग्ण असून दररोज २४ हजार रुग्ण असायचे तिथे आता ५ ते ६ हजार रुग्ण आढळत आहेत. रिकव्हरी रेट ९१ टक्के इतका आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

– डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री आरोग्य प्रधान सचिव

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये आपल्याकडे डेटा जमा झाला आहे, त्याचा वैद्यकीय कारणांसाठी चांगला उपयोग करून घेता येईल’
– संजय कुमार, मुख्य सचिव

‘शासकीय कार्यालयांत गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत असून अशी ठिकाणी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे याठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून गर्दी होऊ देऊ नका. शहरांत रस्त्यावर खाद्य विक्रेते , उपहारगृहे यांत गर्दी वाढू लागली आहे तिथेही नियम पाळण्याची गरज आहे’.

– अजोय मेहता, मुख्यमंत्री प्रधान सल्लागार

‘गडचिरोलीत रुग्ण संख्या सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये दुप्पट झाली आहे . नंदुरबार आणि धुळे येथे अधिक चाचण्या वाढणे गरजेचे आहे. दिल्लीत कोविडची परिस्थिती हवेच्या प्रदुषणामुळे वाढली आहे त्यामुळे संसर्ग वाढला आहे’.
– डॉ दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्री सल्लागार

‘साधारण ९ महिने झाले कोविडशी लढाई सुरु आहे. अनेक निकषांवर चांगली कामगिरी होत आहे पण आता अधिक आव्हाने आहेत. युरोपात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यांत देखील दुसऱ्या लाटेची भीती वाटते आहे अशा परिस्थितीत आपण पुढील काळातले नियोजन केले पाहिजे’
– सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य

‘दुसरी लाट कधी येईल याविषयी चर्चा सुरु आहे . हिवाळ्यात जिथे जिथे तापमान कमी झाले तिथे, तसेच औद्योगिक भागात कोरोना वाढू शकतो. चाचण्या अधिक वाढविणे तसेच रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे गरजेचे आहे’
– डॉ शशांक जोशी, टास्क फोर्सचे डॉक्टर


हेही वाचा – उच्च न्यायालयाचा अर्णब गोस्वामींना जामीन द्यायला नकार! अलिबाग न्यायालयातच सुनावणी होणार!

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -