घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन काही फरक पडणार नाही, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन काही फरक पडणार नाही, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर घणाघात

Subscribe

सरकार लोकासाठी असते केवळ नफा कमवण्यासाठी नसतं हे त्यावेळी काँग्रेसनं दाखवून दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. राष्ट्रपतीच्या उपस्थितीत मंत्र्यांना शपथविधी दिली जात आहे. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन काहीच फरक पडणार नाही असा टोला लगावला आहे. तर मोदी सरकारने मागील ७ वर्षांत फक्त सत्ता एन्जॉय करुन लोकांना बरबाद केला असल्याची परखड टीका नाना पटोले यांनी केली आहे. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी फेरबदल सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

देशातील वाढती महागाई आणि मोदी सरकारची धोरणं याविरोधात काँग्रेस गुरुवारी राज्यभर सायकल रॅली काढणार आहे. राज्यातील तालुका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे सायकल मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. या रॅलीमध्ये नाना पटोले नागपूरमधून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावार नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

केंद्रातील मोदी सरकारने केवळ मागील ७ वर्ष सत्ता एन्जॉय केली आहे. सत्तेचा उपभोग करत लोकांना बरबाद करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करा किंवा करुन नका त्याने काही फरक पडत नाही. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे फाईलही जात नसल्याचे स्वतः मंत्र्यांनी सांगितले आहे. देशाचा सर्व कारभार पीएमओ चालवत आहेत. लोकतंत्र संपलं आहे त्यामुळे फेरबदल करुन पाप धुवून काढता येणार नाही अशी खोचक टीका नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

मोदींच्या राज्यात देशातील नागरिकांचे जगणं मुश्किल झालं आहे. देशाच्या जनतेसोबत काँग्रेस कायम उभी होती. सरकार लोकासाठी असते केवळ नफा कमवण्यासाठी नसतं हे त्यावेळी काँग्रेसनं दाखवून दिले होते. मोदींची सत्ता देशात आल्यापासून महागाई वाढवली आहे. उज्ज्वल योजनेतून लोकांच्या घरोघरी गॅस पोहोचवला परंतु आता महागाई वाढवल्यामुळे गॅस मिळत नाही. रॉकेलही बंद केलं असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. गॅस सबसिडी मोदी सरकारने काढून टाकली आहे यामुळे काँग्रेस राज्यभरात सायकल मार्च काढणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -