घरमहाराष्ट्रनाशिककांदाचाळीत युरिया टाकत साडेपाच लाखांचे नुकसान

कांदाचाळीत युरिया टाकत साडेपाच लाखांचे नुकसान

Subscribe
देवळा : तालुक्यातील भऊर येथील शेतकरी विष्णु बापू आहेर यांच्या मालकीच्या शेतातील कांदा चाळीत काही समाजकंटकांनी रासायनिक युरिया टाकल्याने शेतकर्‍याचे जवळपास साडेपाच लाखांचे नुकसान झालेले आहे.
कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा मागील वर्षी झालेल्या विक्रीतून उत्पादन खर्च देखील निघलेला नव्हता त्यातच या वर्षीच्या साठवलेल्या कांद्याच्या चाळीमध्ये रसायनिक युरिया समाजकंटकांनी टाकत नुकसान केल्याने दुष्काळात तेरावा महिन्याची परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे.
या वर्षी कांद्याला नुकताच चांगला भाव मिळायला सुरुवात झाली होती, मात्र त्यातच अशा प्रकारची घटना तालुक्यात घडल्याने कांदा उत्पादकांकडून अशा समाजकंटकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत आहेर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी कांदा साठवणुकीसाठी आपल्या राहत्या  घरासमोर कांदा चाळ उभारली आहे. साठवलेला कांदा सडत असल्याचे आहेर यांच्या लक्षात आले.  खराब वातावरणामुळे सर्वत्र कांदा खराब होत असल्याने आपलाही कांदा खराब होत असेल असा त्यांचा समज झाला. खराब कांदा चाळीबाहेर काढण्यास सुरूवात केली असता समाजकंटकाने आपल्या चाळीत कांद्यावर युरिया टाकल्याचे लक्षात आले. १२० क्विंटल कांदा खराब झाल्याने आहेर यांचे आजच्या बाजारभावाने जवळपास साडे पाच लाख रुपयांचे नुकसान आहे.

मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करत पाण्याचे काटेकोर नियोजन करून कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळायला लागताच कुणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या कांदा चाळीत रासायनिक खत युरिया टाकल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  – विष्णू आहेर, शेतकरी


हे देखील वाचा – फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषवणार आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद



- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -