घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएनसीसीमध्ये निवड न झाल्याने तरुणाची आत्महत्या

एनसीसीमध्ये निवड न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Subscribe

ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची ताजी घटना ताजी असतानाच एनसीसीमध्ये निवड न झाल्याने एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बुधवारी (दि.११) दुपारी १ वाजता इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात घडली. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वैभव दत्तू मते (वय १८, रा. मुरंबी, ता.इगतपुरी, जि.नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वैभवच्या मित्रांची नाशिकमधील नामांकित महाविद्यालयातील एनसीसीमध्ये निवड झाली. मात्र, त्याची निवड झाली नाही. ही बाब त्याच्या जिवारी लागली. त्यातून तो ताणतणावात होता. बुधवारी दुपारी त्याचे कुटुंबिय त्याला घरीच थांब बोलले होते. त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब सागर कचरु मते यांना समताच त्यास दुपारी २ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -