घरताज्या घडामोडीदिलासादायक! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; देशात 5910 नवे रुग्ण

दिलासादायक! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; देशात 5910 नवे रुग्ण

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सध्या घट होताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सध्या घट होताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णवाढीच्या आलेखात आता उतार होत असल्याचे दिसत असून ही दिलासादायक बाब आहे. तसेच, गेल्या 24 तासांत देशात 7 हजार 34 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. (new 5910 coronavirus cases recorded in last 24 hours in India)

देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात 53 हजार 974 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात शनिवारी 6 हजार 809 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे रविवारी तुलनेने रुग्णांची संख्या 899 ने घसरली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे.

- Advertisement -

गेल्या 24 तासांत राज्यात 1 हजार 205 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी दिवसभरात एकूण 1 हजार 532 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1532 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 79 लाख 48 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के एवढे झाले आहे. महाराष्ट्रात सध्या आठ हजार 364 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 2949 सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -

त्याशिवाय, ठाणे 1882 आणि पुणे 1735 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी एक हजार पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये तीन सक्रीय रुग्ण आहेत. नंदूरबारध्ये पाच सक्रीय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये सहा सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – नंबर सगळ्यांकडे होता, पण धोनीनेच मेसेज केला; कर्णधारपद सोडल्यानंतरचा विराट कोहलीने सांगितला किस्सा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -