घरमहाराष्ट्रराष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान

Subscribe

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा एका जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले आणि युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आज केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे डॉ. अतुल कुलकर्णी (सचिव,जनकल्याण रक्तपेढी,पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले.

करा सन्मान तिरंग्याचा

नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा गेल्या वर्षा २०१० पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते. २६ जानेवारी व १५ ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीयध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात व ते कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो, असे होवू नये म्हणून नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असल्याचेही डॉ. अतुल कुलकर्णी यावेळी म्हणाले. २३ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत जनजागृती अभियान सुरु होत आहे. या अभियानाच्या दरम्यान पथनाटय, शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -