घरताज्या घडामोडीबाळासाहेबांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला किती दिवस ब्लॅकमेल कराल?, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना...

बाळासाहेबांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला किती दिवस ब्लॅकमेल कराल?, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक आमदार आणि नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी शिवसेनेत बंडखोरी केली तेव्हा रामदास कदम भावूक झाले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, बाळासाहेबांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला किती दिवस ब्लॅकमेल कराल?, असा सवाल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

रामदास कदमांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आजे जे काही मिळालं आहे. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मुलगा असल्यानं मिळालं आहे. आदित्य ठाकरेंना पक्षात आणि सत्तेत जे स्थान मिळालं ते उद्धव ठाकरेंचा मुलगा असल्यानंच मिळालं असल्याचं सांगत राज्यात शिवसेना कुणी उभी केली?, असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार असतील तर आम्हीदेखील राज्याचा दौरा करू, नेमकं यामध्ये सत्य काय आहे, हे आम्हीही जनतेला सांगू, असं म्हणत रामदास कदमांनी ठाकरेंना आव्हान दिलं.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता ते राज्याचा दौरा करायला निघाले आहेत, परंतु ते अडीच वर्ष सत्तेत असताना तेव्हा काय झालं होतं?, सामान्य शिवसैनिकांच्या बळावर राज्यात शिवसेना वाढली आहे, असं कदम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : बाळासाहेबांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला किती दिवस ब्लॅकमेल कराल?, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -