घरमहाराष्ट्रशरद पवार राज्यभर दौरा करत असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून राहिले; रामदास...

शरद पवार राज्यभर दौरा करत असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून राहिले; रामदास कदम यांची टीका

Subscribe

रत्नागिरी – शरद पवारांसारखी व्यक्ती या वयात राज्यात फिरून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरे मुख्मयंत्री म्हणून मातोश्रीत बसून राहिले. त्यांना इतरांना गद्दार म्हणण्याचा काय अधिकार? असा परखड सवाल शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी विचारला आहे. रामदास कदम पुन्हा एकदा सक्रीय झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा प्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

हेही वाचा – ‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेने हिणवताच, ‘पेग्विन सेना म्हणायचे का?’ भाजपाचा सवाल

- Advertisement -

‘१९७० पासून मी शिवसेनेचं काम करतोय. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने प्रेरित होऊन आम्ही काम सुरू केलं. आम्ही अनेक केसेस अंगावर गेतल्या. जेल भोगली. आदित्य ठाकरेंनी किती जेल भोगली? उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हणाले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं,’ असं रामदास कदम म्हणाले.

‘शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर गादीवर बसले. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे, असंही कदम यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिली. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव टाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अदिकार नाही. खरी शविसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत,’ असा दावाही रामदास कदमांनी पुन्हा केला.

- Advertisement -

हेही वाचा – प्रत्येकवेळी राजकीय चर्चा झाल्याच पाहिजेत का? राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

‘शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब माझ्या कांदिवलीतील गणपतीला नेहमी दर्शनाला यायचे. ज्यावेळी माझ्याकडून चांगले काम व्हायचे तेव्हा मोठे साहेब पाठ थोपटायचे. एकदा संध्याकाळी साडेआठची वेळ होती. राहुल बजाज हे बाळासाहेबांसोबत होते. तेव्हा मी पोहोचलो. तेव्हा बजाज यांना माझी ओळख करून देताना साहेब म्हणाले, नारायण राणे, राज ठाकरे जाने के बाद मेरी शिवसेना इसने बचायी असं साहेबांनी माझी ओळख करून दिली. आणि त्याच रामदास कदमांना दीड वर्ष उद्धव ठाकरे भेटत नाही’, अशी खंत कमदांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -